Dad thy Love
Sunday, March 30, 2025
गुढीपाडवा कथा
Friday, January 24, 2025
क्षमासुगंध प्रार्थना (प्राकृत)
Thursday, January 16, 2025
किरात रुद्र सूक्त
Tuesday, October 24, 2023
Thursday, June 2, 2016
श्री गुरुचरण महिन
श्री गुरुचरण महिन्यात १ ० ८ वेळा हनुमानचलिसा का पठाण करावे ह्याचे महात्म्य सांगणारी कथा आधी बघुया.
संत तुलसीदासांच्या काळात काऴया कुविद्देच्या उपासकांनी गंगातीरावर एकमंदिर बांधले होते त्या मंदिराचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य केवळ हनुमंतामध्येआहे हे जाणून तुलसीदासांनी श्री हनुमंताना प्रसन्न करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाखाली बसून रोज तीन वेळा हनुमानचलिसा पठणास बसले . रोज तीन वेळा म्हणजे सकाळी १ ० ८ वेळा, दुपारी १ ० ८ वेळा व संध्याकाळी १ ० ८ वेळा आणि तेही तीस दिवस. तीस दिवसांनी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हनुमंत प्रकट झाले व त्यांनी ती अपवित्र वाईटवस्तु नष्ट केली. त्यामुळे तुलसीदासांना अत्यंत आनंद झाला. त्यांना आनंदात बघून हनुमानजी तुलसीदासांना प्रश्न करतात की," तु एवढा आनंदित का? तुझे संरक्षण पहिल्यापासूनच होते". त्यावर तुलसीदासजी म्हणतात की "हनुमानजी मी आता सर्वांना सांगू शकतो की, आपल्या कडे भक्तीचा लवलेश ही नसताना दयाळु हनुमंतानी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या अपवित्र वस्तुचा नाश केला आहे व आपले सर्वांचे रक्षण केले आहे. म्हणूनआपण सर्वजण हनुमंताचे स्मरण करूया. केवळ ह्या निमिताने तरी ते आपले (हनुमंताचे) नामस्मरण करतील."
त्यावर तुलसीदासांची निष्ठा तपासण्यासाठी हनुमंतजी त्यांना उलट प्रश्न करतात "तुझ्यावर विश्वास कोण ठेवील?". त्यावर तुलसीदासजी वादावादी न करता हनुमानजींना सांगतात "देवा तु म्हणतोस ते बरोबर", येवढे बोलून पुन्हा पठण करण्यास बसतात.
त्यानंतर हनुमानजी मानवी रुपात गावात जाऊन ४-5 जणांना सांगतात की,त्या वटवृक्षाखाली बसलेला म्हातारा पाखंडी आहे. तुम्ही जाऊन त्याला मारा.
हनुमंताच्या मुखातील हे शब्द ऐकताच ते सर्वजण काठयांनी तुलसीदासजीवर वार करतात व त्यांना दगडानी मारतात परंतु त्यांना काहीचं होत नाही,उलट दगड मारण्यारयाच्या उलटे येतात, ते सर्वजण घाबरतात व भीतीपोटी(प्रेमाने नाही) तुलसीदासांना शरण जातात. त्याचवेळी तुलसीदासजी त्यांना सांगतात "माझ्याकडे काही जादू नाही, हे सामर्थ आहे त्या हनुमंतांचे, त्याच्या हनुमान चालीसा पठणाचे, तुम्ही मारलेल्या दगडांची काठयांची फुले होतील व हनुमंताच्या चरणाशी पडतील, आणि तसेच होते. ते सर्वजण तुलसीदासजीकडे हनुमान चालिसा शिकू लागतात.
त्या रात्री पुन्हां हनुमानजी तुलसीदास बरोबर समोर प्रकट होऊन त्यांना विचारतात "तु एवढा खुष का? तुला काय मिळाले?", तुलसीदासजी उतरतात "तुझ्या नामाची गोडी सामान्य जनांना लागली, मला पाहिजे ते मिळालं", त्याला हनुमानजी तुलसीदासांना विचारतात "मग त्याने काय झाले?", त्यावर तुलसीदासानी दिलेले उत्तर त्यांच्या भक्तीची परमोच्च स्तिथी दर्शविते, तुलसीदासजी म्हणतात "हे मी जाणत नाही, ते तू आणि लोक जाणो. मी एवढेच जाणतो की, तू व तुझे नाम अतिशय सुंदर आहे, पवित्रआहे, तू काय करू शकतोस हे जाणून घेण्याची मला आवश्यकता नाही". कृपाळू हनुमंत प्रसन्न होतात व तुलसीदासांना सांगतात, "तू जे काहीमागायचं ते माग".
तुलसीदासजी अत्यंत विनम्रपणे हनुमंताना प्रार्थना करतात "हे दयाळू हनुमान जो कोणी ह्या तीस दिवसात म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्याकालावधीत, घरात, मंदिरात, जंगलात, किंवा शक्य असेल तेथे कुठेही बसून ३0 दिवसातून १ दिवस केवळ एकदाच १ ० ८ वेळा हनुमान चालिसाचेपठण करील त्याचे तू रक्षण कर, मात्र तू माझी परीक्षा घेतली तशी त्यांची परीक्षा तू घेऊ नकोस ".
तुलसीदासांच्या मुखातील हे शब्द ऎकून हनुमानजी प्रसन्न होतात व"तस्थास्तु" म्हणून निघून जातात. तेव्हांपासून एका दिवसात १ ० ८ वेळाहनुमान चालिसा म्हणण्याची प्रथा सुरु झाली.
Friday, May 20, 2016
वैशाख पौर्णिमा पूजन
वैशाख पौर्णिमा पूजन
वैशाख पौर्णिमाच्या दिवशी सत्य,प्रेम, व आनंद ह्या पवित्र त्रीसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व ) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात आणि त्यावेळी ते सत्वृत्तीच्या उत्थपनाची योजना आखतात. या दिवशी सदगुरू आपल्या लाभेवीन प्रेमाची जास्तीत जास्त उधळण करतात आणि सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात. या दिवशी आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.
वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.
१. वैशाख पौर्णिमा हि बुद्धपुर्णिमा आहे.
२. वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.
३. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चौवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते कारण भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.
यंदाची वैशाख पौर्णिमा शनिवार दिनांक 21/05/2016 रोजी आहे. सदगुरू बापूंनी ह्या दिवशी पुढील प्रमाणे उपासना करण्यास सांगितले आहे.
वैशाख पौर्णिमा उपासना :-
१. प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे, नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.
२. श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.
३. दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे. ( सदगुरू तारक मंत्र – ॐ मनः सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नम:)
४. त्यानंतर १. श्री अनिरुद्द कवच २. श्री हनुमान चालीसा ३. श्री हनुमान स्तोत्र ४. श्रीसाईनाथांची 11 वचने ५. श्री अनिरुद्धांची ९ वचने ६. श्री आदिमाता शुभंकर स्तवन व श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवन या पैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे.
५. त्यानंतर १. आंब्याचे पन्ह २. कच्चा आंबा व भिजलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद अर्पण करावा. त्यानंतर लोटांगण घालावे.
हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणारया षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत. म्हणून त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम,क्रोध,मोह,मद,मस्तर, लोभ या षडरीपुंपासून दूर राहण्यासाठी हि साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.
जो कोणी प्रेमाने वैशाख पौर्णिमेला हि उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला श्री सदगुरू श्री हनुमंता बरोबर येवून जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धानी दिली आहे.
🙏|| मी अम्बज्ञ आहे ||🙏
Sunday, May 8, 2016
अक्षयतृतीया पुजन विधी
।। हरि: ॐ ।।
अतिरिक्त फोटो/मूर्ति यांच्या विसर्जनासंदर्भात सदगुरू श्रीअनिरुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे
अक्षयतृतीयेस खालील संपूर्ण विधि दुपारी बारा वाजण्याच्या आत पूर्ण करणे.
1) स्वत: गन्ध (चन्दन) उगाळावे.
2) दोन प्रकारच्या अक्षता बनवाव्या- हरिद्रा(हळद)-अक्षता आणि कुंकुम-अक्षता.
3) फुले, गूळ-खोबऱ्याची वाटी आणि धूप ही सामग्री तयार ठेवावी.
पूजेत एकाच देवाच्या दोन तसबिरी किंवा मूर्ति ठेवू नयेत. त्याचबरोबर जे अतिरिक्त फोटो/मूर्ति विसर्जित करण्याची इच्छा आहे, ते सर्व एका पवित्र जागी पवित्र वस्त्रावर ठेवणे.
4) सर्व मूर्ति/फोटोंना गन्ध लावावे, दोन्ही प्रकारच्या अक्षता अर्पण कराव्या. त्यांना फुले वाहावी, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि धूप करावा.
मग हे सर्व एका सोवळ्यात गुंडाळून त्यांचे दुपारी बारा वाजण्याच्या आत विसर्जन करावे.
।। हरिॐ।।श्रीराम।। अंबज्ञ।।






